संगमेश्वर/प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील पांचाबे नेरदवाडी येथे गोठ्यावर वीज पडून सुकलेल्या गवताने पेट घेऊन लागलेल्या आगीत १३ जनावरे जळून मृत्युमुखी पडली. ही दुदैवी घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली तर मालकाचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले.
संगमेश्वर तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार ८ जुलै २०२२ रोजी रात्री १. ३० वाजण्याच्या सुमारास मौजे – पाचांबे (नेदरवाडी) ता. संगमेश्वर येथे संजय महिपत जाधव यांच्या मालकीच्या गोठ्यावर वीज पडून गोठ्यातील वाळलेल्या चाऱ्याने पेट घेतला आणि आग लागली. यात गोठ्यातील १३जनावरे मृत्यूमुखी पडल्याचे पंचांनी सांगितले आहे. याबाबत माहिती मिळताच तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
हे हा वाचा : Ratnagiri : किंजलघर येथे दरड कोसळली; तीन घरांना धोका