राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हा परिषदेला जागा पहाणीचे दिले आदेश, राज्यात 10 हजार पेंद्रांची करणार उभारणी
गुहागर प्रतिनिधी
पीक विमा योजना, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना, कृषी हवामान सला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन याप्रकारच्या विविध उपक्रमांसाठी हवामानविषयक माहिती मिळावी यासाठी जिल्ह्यात महसूल मंडळ स्तरावर 302 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत पत्येक जिल्हा परिषद स्तरावर राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जागेच्या पहाणीचे आदेश दिले आहेत. संपूर्ण राज्यात 10 हजार केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये शासनाच्या मान्यतेने स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि. या सेवा पुरवठादार संस्थेमार्पत महावेध या प्रकल्पांतर्गत महसूल मंडळ स्तरावर एकूण 2127 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. याद्वारे प्रा‰ होणाऱया हवामानविषयक माहितीचा (पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱयाची दिशा, वाऱयाचा वेग) उपयोग पीक विमा योजना, हवामान आधारित फळ पिक विमा योजना, कृषी हवामान सला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन याप्रकारच्या विविध उपक्रमांसाठी होत आहे.
सद्यस्थितीत स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या मर्यादित 2127 असल्याने राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यांमध्ये वाढीव 10 हजार स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याबाबत निर्देश प्रा‰ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 26 सप्टेंबर रोजी प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये राज्यातील 29 हजार ग्रामपंचायतीपैकी दहा हजार ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्याचे ठरले आहे. यासाठी निर्धारीत तांत्रिक निकषानुसार जागा उपलब्ध करून देणाऱया दहा हजार ग्रामपंचायतीत प्रकल्प राबविता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून जागा निवडीच्या निकषानुसार सर्व जिह्यांकडून प्रस्ताव मागवण्यात यावेत व एकत्रित प्रस्ताव शासनास सादर करावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 65 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामुळे आणखी 302 केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये हा उपकम राबवण्यात येत असून यामध्ये अहमदनगर 469, अकोला 193, अमरावती 304, औरंगाबाद 311, भंडारा 195, बीड 367, बुलढाणा 312, चंद्रपूर 301, धुळे 198, गडचिरोली 166, गोंदिया 198, हिंगोली 202, जळगाव 412, जालना 279, कोल्हापूर 368, लातूर 282, नागपूर 280, नांदेड 469, नंदूरबार 208, नाशिक 496, उस्मानाबाद 223, पालघर 170, परभणी 252, पुणे 506, रायगड 291, रत्नागिरी 302, सांगली 251, सातारा 526, सिंधुदुर्ग 156, सोलापूर 367, ठाणे 155, वर्धा 186, वाशीम 176, यवतमाळ 432 अशी केंद्रे उभारणी करण्यात येणार आहे.