वार्ताहर/ताम्हाने
चिपळूण तालुक्यातील शिरवली, पाथर्डी परिसरात गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. कळपाने आढळणारे हे गवे शेतीची नासधूस करत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हात आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या गवे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने माळरानावर झाडी खूप वाढली आहे. त्यामुळे गव्यांना वावरणे सोपे जाते. माळरानावर गायी-गुरे चरण्यासाठी नेले जातात. त्यामुळे गव्यांपासून गुरांना धोका निर्माण झाला आहे. माणसांनाही फिरणे कठीण बनले आहे. रात्री-अपरात्री ते मानवी वस्तीकडेही येतात. नुकतीच लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत लावलेली भातशेती किंवा नाचणीची शेती उद्ध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या घवा रेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हे हा वाचा : परशुराम घाटातील प्रशासनाचा खेळ संपता संपेना! दहा दिवसांपासून वाहतूक बंद