7 वर्षे सश्रम कारावास, 15 हजाराचा दंड; राजापुरातील पांगरे येथील घटना
रत्नागिरी प्रतिनिधी
राजापुरातील पांगरे येथे तरूणीवर बलात्काराचा पयत्न करणाऱ्या तरूणाला न्यायालयाने 7 वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी सुरेंद्र सुरेश बाईत (25, ऱा कोंड्येतर्फे सौंदळ त़ा राजापूर) असे आरोपीचे नाव आह़े महाविद्यालयातून पायवाटेने घरी चालत जात असलेल्या तरूणीला एकटी गाठून जबरदस्ती केल्याचा आरोप सुरेंद्र याच्यावर ठेवण्यात आला होत़ा.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाकडून ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. राजापूर पांगरे येथील 18 वर्षीय तरूणी 25 सप्टेंबर 2019 रोजी महाविद्यालयातून घरी पायवाटेने चालत जात होत़ी दुपारी 12 च्या सुमारास पांगरे गावमळावाडी सीमेच्या हद्दीजवळ ही तरूणी पोहोचल़ी यावेळी तरूणी एकटी असल्याचे हेरून आरोपी सुरेंद्र हा डाव साधण्यासाठी तरूणीच्या जवळ गेल़ा.
तरूणीजवळ पोहचताच सुरेंद्रने तिचे दोन्ही हात पकडून तिला जंगलमय भागात फरफटत ओढत नेल़े तसेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पीडित तरूणीने राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होत़ी त्यानुसार पोलिसांनी सुरेंद्र याच्याविरूद्ध भादंवि कलम 376, 511, 354, 323 व 506 नुसार गुन्हा दाखल केला.या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस़ एम. वालावलकर यांनी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े न्यायालयाने आरोपी सुरेंद्र याला भादंवि कलम 376 सह 511 नुसार 7 वर्षे सश्रम कारावास, 10 हजाराचा दंड, 354 नुसार 2 वर्षे कारावास 5 हजार रूपये दंड व 323 व 506 नुसार 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावल़ी न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून राजापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल किरण सकपाळे यांनी काम पाहिल़े.