जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ चा इशारा कायम
प्रतिनिधी/रत्नागिरी
सतत कोसळणाऱ्या पावसाने कोकणात धुमाकूळ घातला असतानाच आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात १० ते १३ जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोकणातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस झोडपून काढत आहे.
जून महिन्यातील पावसाची कसर जुलै महिन्यात पाऊस भरून काढणार आहे. कारण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने प्रचंड जोर पकडला आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशासनाकडून रत्नागिरीतील नागरिकांना सावधानता व सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या
रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला, मात्र सावट कायम ९ जुलै रोजी रत्नागिरी शहरात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी संपूर्ण दिवसभर आभाळात गडद काळ्या ढगांची दाटीवाटी होती. यामुळे येणारे काही दिवस हे अतिवृष्टीचे असण्याचे शक्यता आहे.