पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील ग्रामीण भागात एसटीला कमी भारमान मिळत असल्याने अनेक फेऱया बंद करण्याची नामुष्की विभागावर ओढवल़ी यातून पर्याय काढण्यासाठी मोठय़ा बसऐवजी मिनी बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े त्यानुसार एसटीच्या रत्नागिरी विभागाला नवीन 50 मिनी बस देण्यात येणार आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल़ी
कोरोना साथीचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला होत़ा यानंतर झालेल्या एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळेही एसटीला मोठय़ा नुकसानीला समोर जावे लागले होत़े अखेर 6 महिन्यानंतर कर्मचाऱयांनी संप मागे घेवून एसटीच्या फेऱया पूर्ववत करण्यात आल्य़ा मात्र प्रवाशांनी प्रवासासाठी पर्यायी मागे शोधल्याने थंडा प्रतिसाद या फेऱयांना मिळत असल्याचे दिसल़े यातूनच कमी भारमानामुळे ग्रामीण भागातील अनेक बस फेऱया बंद ठेवण्यात आल्य़ा याचा फटका विद्यार्थी व नियमित कामावर येणाऱयांना बसत आह़े
एसटीच्या ग्रामीण भागातील फेऱया पूर्ववत कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आह़े मात्र कमी भारमानाचे कारण पुढे करत एसटी विभागाकडून फेऱया सुरू करण्यात टाळाटाळ करण्यात आल़ी यातून मार्ग काढण्यासाठी मिनी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल़ा त्या संबंधी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत एसटी महामंडळाला विनंती केली होत़ी त्यानुसार आता सुरूवातीला 50 मिनी बस कंत्राटी पद्धतीने एसटीच्या रत्नागिरी विभागाला देण्यात येणार आहेत. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून या बसमध्ये आणखी वाढ करण्याचाही विचार एसटी महामंडळाकडून करण्यात येत आह़े
नुकतेच रत्नागिरी विभागाला बीएस-6 च्या 50 पैकी नव्या कोऱया 21 बस देण्यात आल्या आहेत़ या बसही कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येत आहेत़ यातील चालक व बसचा देखभाल खर्च हा संबंधित कंपनी करणार आह़े बसमधील वाहक हा मात्र एसटी महामंडळाचा असणार आह़े त्याच धर्तीवर मिनी बसही चालवण्यात येणार आह़े मोठय़ा गाडय़ांसाठी 44 रूपये प्रतिकिलोमीटर देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आह़े दरदिवशी 400 कि.मी. पूर्ण करण्याचे लक्ष्य या बसना देण्यात आले आह़े
प्रवाशांचा प्रवास होतोय अधिक सुखकर
एसटीचे अत्याधुनिकरण करण्याच्या दृष्टीने जुन्या बसगाडय़ा हळूहळू भंगारात काढून नव्याने बस वापरात आणण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला होत़ा जुन्या गांडय़ांमुळे प्रदूषण होत असल्याने नव्याने बीएस 6 प्रणालीच्या बस आणण्यात आल्य़ा या बसमध्ये अत्याधुनिक उत्तम दर्जाच्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. यामध्ये स्वयंचलित दरवाजा, मोबाईल चार्जिंग, उद्घोषणेची सुविधा, फर्स्टएड आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत़ त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होत असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.