रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील खालच्या भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांनंतर आता त्यावर मारल्या जाणाऱया सीलकोटचे चपचपून मारले जाणारे डांबर भर दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने पाण्यासारखे वितळत आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी रस्त्यावर जाणारी एक पादचारी महिला लक्ष्मीचौक येथे अशाच डांबराने वितळलेल्या रस्त्यात चांगलीच फसली…अडखळून पडल्यानंतर तिला बाहेर काढण्यासासाठी इतर महिलांनी हात दिल्याने तिची सुटका झाली.
शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाची उर्वरित कामे अजूनही सुरू आहेत. आता डांबरीकरणाच्या थरानंतर त्या रस्त्यांवर सीलकोट मारण्याची कामांना पारंभ झालेला आहे. शहरातील लक्ष्मीचौक या भागात रस्त्यावर सीलकोट मारण्यात आलेला आहे. या सीलकोटचे डांबर रणरणत्या उन्हाने दुपारच्यावेळेस चांगलेच वितळू लागलेले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता वितळल्याचा पत्यय येत आहे. याच रस्त्यांवरून भर दुपारी चालताना एक महिला पुरती फसली होती.
रस्त्यांचे डांबर उन्हामुळे चांगलेच वितळलेले हेते. त्यातून पुढे जात असताना त्या महिलेल्या चप्पल डांबरात रूतल्या. त्यामुळे तिची पुढे वाट काढताना चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पावला पावलावर तिच्या चप्पल रुतून बसत होत्या. त्यामुळे चालताना पुढे जाण्याच्या पयत्नात ती चांगलीच अडखळली. तोल गेल्याने तिने त्या वितळलेल्या डांबरावर हातही टेकले. त्यातुन ती कशीबशी स्वतला सावरत उठून पुन्हा पुढे जाउ लागली. ती डांबरात फसल्याची बाब अन्य महिलांनी पाहिली. त्यांनी तिला मदतीचा हात देत वितळलेल्या डांबराबाहेर घेतल्याने तिची सुटका केली. त्यामुळे रत्नागिरीकरांनो भर दुपारी रस्त्यावरून चालताना जरा सावधानता बाळगा. नाहीतर गुळगुळीत झालेल्या रस्त्यावरून चालताना फसाल…घसराल!!… अशा मिश्कील आणि खबरदारीच्या पतिकिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.