ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या कित्येक महिन्यांपासून रेपो रेट जैसे थे होता. मात्र आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रेपो दरात (Repo Rate) ०.४ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. यामुळे रेपो रेट ४. ४४ टक्के झाला आहे. रेपो रेट वाढल्याने बँकांसह सर्वसामान्यांना कर्ज घेणे (Bank Loan) महाग होणार आहे. महागाईमुळे जनता त्रस्त असताना आता सामान्यांना आणखी एक जोरदार फटका बसला आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या कर्जांचे हप्ते महागणार आहेत.
दरम्यान, बुधवारी अचानक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत बेंचमार्क पॉलिसी रेटमध्ये वाढ केली. आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉइंट म्हणजेच ०.४ टक्के वाढ केली आहे. कोरोनाच्या काळात रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आता ०.४ टक्के वाढ केल्यानं रेपो रेट ४.४ टक्के इतका झाला आहे. तर आरबीआयच्या या निर्णयाचा फटका सामान्यांना बसणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जांचे हप्ते वाढणार आहे.
सध्याच्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पतधोरण समीतीच बैठक झाली. यावेळी रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेने याआधीच्या बैठकीत वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर रेपो रेटमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.