प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांचे प्रतिपादन
वार्ताहर /पणजी
मनाचा विकास वाचनामुळे होत असतो. दुसऱयाच्या मनात डोकावण्याची संधी वाचनामुळे मिळते. वाचनानंतर आपण चिंतन करतो त्याला खोली असते तर वाचनानंतर विचार करतो, त्याला उंची लाभते. वाचन संस्कृतीने आम्हाला समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन लेखक, समीक्षक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी येथे केले.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या राष्ष्ट्रीय पुस्तक सप्ताहाचा समारोप सोहळा व स्थापनादिवस गुरुवारी आयएमबीच्या छोटेखानी सभागृहात पार पडला त्यावेळी ‘वाचन संस्कृती’ या विषयावर कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्ये÷ कवी दशरथ परब होते. यावेळी पुस्तक सप्ताहानिमित्ताने आयोजित केलेल्या पोर्ट्रेट कार्यशाळेचे संचालक संजय हरमलकर यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी कार्यशाळेत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मॉडेल म्हणून कार्यशाळेत बोलविलेले मान्यवर प्राचार्य अनिल सामंत व दशरथ परब यांची पोर्ट्रेट साकारली होती.
ग्रंथोपजीवी कमी असले तरी ते समाजाला मार्गदर्शन करतात, असे सांगून प्रा. कुलकर्णी म्हणाले, भाषेचे उपकार असे अल्प काळ नसतात. समृद्ध संत साहित्य, दिवाळी अंकांची परंपरा व संगीत रंगभूमी ही मराठीची मोठी वैशिष्टय़े आहेत. ई माध्यमाने कुठलाही विचारवंत तयार केलेला नाही, असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, वाचनाची सवय कायम ठेवण्याची जबाबदारी एक काळ शिक्षण क्षेत्राची होती पण आता ही गोष्ट मागे पडली आहे. जीवनाचे वेगळं सम्यक दर्शन घडविण्याचे कार्य वाचन करत असते. पुस्तकं आपल्याला वैचारिक पातळीवर नेतात म्हणून सुजाण वाचक होणे गरजेचे आहे याची जाणीव कुलकर्णी यांनी करून दिली. संजय हरमलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दशरथ परब यांनी स्वागत केले. सदस्य सचिव अशोक परब यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आयएमबीचे कार्यकारी सदस्य सागर जावडेकर, डॉ. आशा गेहलोत, कालिका बापट व्यासपीठावर उपस्थित होत्या.