मोरजी /प्रतिनिधी
अतिदुर्मिळ असलेल्या बुद्धी आणि शक्तीचे प्रतिक असलेल्या श्री राम भक्त हनुमंतांची उपासना म्हणजे हनुमान चालीसा तिचे सातत्याने पठण करा असे प्रतिपादन कोरगावच्या श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक विठोबा बगळी यांनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी कुंडई संचलित संत समाज ,मांदे आणि पार्से यांच्या तर्फे आगरवाडा येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त आयोजित केलेल्या हनमत् अनु÷ान आंतर्गत समुदायिक ” हनुमान चालीसा ” पठण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर श्री दत्त पद्मनाभ पिठाचे संचालक संजय कलंगुटकर, मार्गदर्शक पुरोहित् अनुपजी शेलार,संत समाज मांदेचे अध्यक्ष महेश गोडकर,संतसमाज पार्सेचे अध्यक्ष सुजन आनंद दिनेश मयेकर,गौरेश कोरगावकर, आनंद म्हामाल,,बटू गौतम, प्रसाद राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री बगळी म्हणाले,आज आपल्या समाजाचा स्वाभिमान नष्ट होत आहे समाजाला ऐकप्रकारचे समूहिक नपुसंकत्व प्राप्त होत आहे त्यासाठी हरवलेला स्वाभिमान जागृत करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती यांचे प्रतिक असलेल्या हनुमंतांची उपासना होणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
श्री दत्त पद्मनाभ पिठाचे संचालक संजय कलंगुटकर म्हणाले,उत्सवातून उत्साह प्राप्त होतो त्यासाठी उत्सव महत्वाचे आहेत.देव,देश आणि धर्म याची पताका हाती घेऊन युवकांनी पुढे यायला हवे पालकांनी आपल्या मुलावर संस्कृतीचे संस्कार करायला हवेत.उच्च संस्कार समाजा पर्यंत पोचवायला हवेत.त्यासाठी बाल संस्कार करणाऱया कार्यक्रमाची गरज आहे.त्यासाठी असे कार्य करणाऱया पद्मनाभ पिठाच्या कार्यात सहभागी व्हा असे सांगितले.
दिनेश मयेकर म्हणाले अनु÷ान, व्रतवैकल्ले समाजात सात्वकि लहरी निर्माण करतात त्यासाठी अश्या कार्यक्रमांची गरज आहे.असे सांगितले.
प्रारंभी महेश गोडकर यांनी स्वागत केले.गौरेश कोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले शेवटी महेश गोडकर यानी आभार मानले
श्री दत्त पद्मनाभ पिठाचे पुरोहित अनुपजी शेलार यांच्या मार्गदर्शना खाली हनुमत अनुष्टान पार पडले त्यांना बटू गौतम व प्रसाद राऊत यांनी सहकार्य केले.
सौ व श्री कल्याण बगळी यांच्या प्रमुख यजमान पदा खाली पार पडलेल्या या समुदायिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात 25-30 जोडप्यांनी सहभाग घेतला