डिचोली तालुक्मयातील सर्व संबंधित खाती अधिकारी सज्ज. साखळीतील पंपींग स्टेशन पूर्ण तयारीत.
डिचोली / प्रतिनिधी
राज्यात आज शुक्र. दि. 8 रोजी हवामान खात्याकडून जोरदार पाऊसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने डिचोली तालुक्मयातील सर्व संबंधित खात्यांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांना उदभवाणाऱया परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र सजक ठेवण्यात आले आहे.
गेल्या सोमवार व मंगळवारी जोरदार पडलेल्या पावसाचा जोर बुधवार आणि काल गुरूवारी कमी झाल्याने साखळीतील वाळवंटी व डिचोलीतील नद्यांची पातळी ओसरली होती. त्यामुळे जोरदार पावसामुळे असलेला संभाव्य पुराचा धोका टळला होता. मात्र आज शुक्र. दि. 8 रोजी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने तसा जर जोरदार पाऊस झाला तर या दोन्ही नद्यांच्या पातळीत बरीच वाढ होऊ शकते. कालण डोंगरमाथ्यावर पावसाचा मारा सुरूच असल्याने नद्यांमधील पाण्याची पातळी मध्यम आहे.
साखळी येथील बाजारात असलेले पंपींग स्टेशन जर पुरस्थिती निर्माण झाल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी सज्ज झालेले आहे. काल गुरू. दि. 7 रोजी साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी या पंपींग स्टेशनची पाहणी केली. या पंपींग स्टेशनवर असलेल्या काही समस्या सोडविण्यात आल्या आहेत. पाणी बाहेर फेकण्यात येणाऱया पाईपला किंचित गळती होती. ती पाईप दुरूस्ती करून गळती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे पंपींग स्टेशन पूर्णक्षमतेने पावसाचा आणि पुरस्थितीचा सामना करण्यास सज्ज झाले आहे.
जोरदार पाऊस झाल्यास साखळीला सर्वात प्रथम पुराचा धोका असतो. परंतु या नदीकिनारी असलेल्या पंपींग स्टेशन म्हणजेच पूरनियंत्रण व्यवस्थापनामुळे साखळी बाजार आणि परिसराला पुराचा धोका कमीच झालेला आहे. तरीही आज शुक्रवारी रेड अलर्ट देण्यात आल्याने अचानक आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास साखळी नगरपालिकेच्या कर्मचाऱयांना सतर्क ठेवण्यात आले आहे. ऐनवेळी लागणारी मदत करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे, असे साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी म्हटले.
साखळी नगरपालिकेतर्फे मोन्सूनपूर्व कामात पालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे व त्यांच्या फांद्या हटविण्यात आल्या होत्या. तसेच गटरे साफ करण्यात आली होती. त्यामुळे या पावसात झाडे कोसळून हानी होण्याच्या घटना नियंत्रणात राहणार, असेही नगराध्यक्ष सावळ यांनी सांगितले.
तिळरी धरणातील पाणी विसर्गामुळे साळ गावातील चिंतेत वाढ
महाराष्ट्रात असलेल्या तिळारी या धरणातील पाण्याची पातळी 4 जुलैपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे वाढत आहे. त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी समोरील तिळारी नदीत धरणाच्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे. अशी नोटीस महाराष्ट्र सरकारच्या जलस्रोत खात्याकडून जारी करण्यात आली आहे. सध्या गोव्यातही पावसाचा जोर मोठा असल्याने तसेच शापोरा नदी भरून वाहत असल्याने तिळारीच्या पाण्यामुळे साळ गावात पुराची चिंता वाढली आहे. तिळारी धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्यावर गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याकडून लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येते. त्याप्रमाणे सदर पाणी नदीतील पातळीचा अंदाज लक्षात घेऊनच सोडण्यात यावे अशी मागणी साळवासीयांनी केली आहे.
तिळारीच्या पाण्यावर सरकारकडून नियमित लक्ष आहे तसेच आपणही वैयक्तिक पातळीवर या विषयी लक्ष घालत आहे. कोणत्याही प्रकारे तिळरी धरणातील पाणी विसर्गाचा त्रास लोकांना होऊ नये यासाठी आपण प्रयत्नरत आहे. जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांशी आपण नियमित संपर्कात आहे, असे डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकात शेटय़े यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडूनही नियमित परिस्थितीचा आढावा
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उदभवणाऱया परिस्थितीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडूनही नियमित आढावा घेण्यात येत आहे. साखळीतील पूरप्रतिबंधक व्यवस्थापन योजना साखळीतील पूर रोखण्यासाठी सक्षम आणि सतर्क आहे. तिळरी धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्यावर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. या पाण्यामुळे साळ व ते तर गावात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वती खबरदारी घेण्यात येणार आहे. तसे आदेशच संबंधित खात्यांना देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.