लखनौ
लखीमपूर खीरी हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी आशीष मिश्राला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सोमवारी मोठा झटका दिला आहे. लखीमपूर खीरीच्या तिकुनिया येथील हिंसेप्रकरणी आरोपी असलेल्या आशीषचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी आशीषला जामीन मंजूर केला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन रद्द केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने जामीन याचिकेवर नव्याने सुनावणी केली होती.