जलस्त्रोत्र मंत्री सुभाष शिरोडकरांचा आदेश
प्रतिनिधी /म्हापसा
जलस्त्रोत्र मंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासमवेत म्हापसा येथे तार नदीची पाहणी केली. या नदीच्या पात्रात सर्वत्र झाडे तयार झाली असून यामुळे पाणी तसेच साचून राहते. हे लक्षात घेऊन व याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर मंत्र्यांनी स्थानिक आमदार व अभियंता वर्गासमवेत येथील तार नदीची पाहणी केली.
पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या भागात गाळ तयार झाला आहे. शिवाय नदी पूर्णतः झाडांनी झाकल्याने येथील झाडे येत्या 10 जूनच्या आत पूर्णतः काढावीत जेणेकरून नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी पत्रकारांना पाहणीअंती दिली.
कार्यकारी अभियंता नाझारेथ वाझ, साहाय्यक अभियंता राजीव कदम, कनिष्ठ अभियंता ब्रह्मानंद पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य मनिषा नाईक, बस्तोडा सरपंच रणजीत उसगावकर, आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासह मंत्री शिरोडकर यांनी येथील तार नदीच्या पात्राची पाहणी केली.
नदीच्या पात्राचा गाळ काढल्यानंतर येथील पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल जेणेकरून गिरी, वाडे सुकूर, म्हापसा खोर्ली भागातील जे पाणी शेतात भरत होते ते सुरळीत होईल व पावसात पूरदृष्टी होणार नाहा.r हा गाळ तार नदी ते मयडे तसेच गिरी दरम्यान पूर्णतः काढण्यात येईल. जेणेकरून या भागात शेती पाण्याखाली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक तत्वावर तळीची साफ सफाई, सैंदर्यीकरण हाती घेणार
जलस्त्रोत्र खात्याने विहिरी, तळीची कामे हाती घेण्याचे ठरविले होते. त्याचे पुढे काहीच झाले नाही यावर बोलताना मंत्री शिरोडकर म्हणाले की, आपण नवीनच आलो आहे. या योजनाद्वारे आपण करमळी, साळपे आदी तळी आपण हातात घेणार आहे. ती तळी खोदून साफ सफाई व सौंदर्यीकरण करण्यात येईल. विहिरी आहे त्यासाठी 10 ते 15 जणांचा गट शेती करण्यास तयार असल्यास त्यांना विहिरी सरकारतर्फे खोदून देण्यात येतील.
त्यावेळी आपला पगार होता फक्त 274 रुपये
राज्यात महागाई वाढली हे खरे आहे. त्यासाठी सरकारकडे अन्य उपाययोजना आहेत. महागाईवर सरकार नियंत्रण ठेवून आहेत. तो विषय नाहक आम्ही येथे आणू नये. पूर्वी म्हणजे 40 वर्षापूर्वी आपण नारळ 2 आण्यात विकत घेत असे. त्यावेळी आपला पगार होता 274 रुपये. आज 50 ते 60 हजारावर आहे. महागाई म्हणजे सदैव चेक आणि बॅलन्स आहे असे मंत्री शिरोडकर म्हणाले.