स्थानिक रहिवाशांची मागणी : वनविभागाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिराशेजारी असलेल्या धोकादायक झाडाकडे दुर्लक्ष झाल्याने रहिवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मंदिराशेजारील धोकादायक वृक्ष तातडीने हटवावा, अशी मागणी वनविभागाकडे केली होती. मात्र, अद्याप वृक्ष हटविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ये-जा करणाऱया पादचाऱयांसह भक्तांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तातडीने हा वृक्ष हटवावा, अशी मागणी रहिवाशांतून होत आहे.
गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिराला लागून असलेला वृक्ष धोकादायक आहे. शिवाय वृक्षाच्या फांद्या देखील धोकादायक बनल्या आहेत. दरम्यान, याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. शिवाय मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तात्काळ धोकादायक असलेला वृक्ष हटवावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे.वृक्षाखाली विद्युत खांब आहे. त्यामुळे विद्युतभारित तारांवरती वृक्ष कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. धोकादायक आणि जुनाट वृक्ष तातडीने हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.