दुरुस्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शहरामध्ये विविध ठिकाणी आरओ प्लांटची उभारणी करण्यात आली. मात्र, बहुतांश आरओ प्लांट बंद पडले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा बंद पडलेल्या आरओ प्लांटची दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ
ऑर्गनायझेशनतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात, धर्मवीर संभाजी चौक यासह इतर परिसरात आरओ प्लांटची उभारणी केली आहे. या आरओ प्लांटमुळे अनेकांना शुद्ध पाणी मिळते.
मात्र, आता बहुतांश आरओ प्लांट बंद अवस्थेत आहेत. शहर तसेच उपनगरांमध्ये जवळपास 21 आरओ प्लांट आहेत. तेव्हा त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राजू गानगी, सिद्धारुढ पाटील, वैभव सुतार, युनूस बागवान, कुशाल पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.