अन्यथा रस्ता विभागाच्या कार्यालयासमोर दगड ठेवून पूजा केली जाईल
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 आणि गावा – गावात जाणारे सर्विस रस्ते शिवाय मुख्य रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शिवाय रस्ते वारंवार खोदकाम करून ते तसेच ठेवून धोकादायक स्थिती ठेवले जातात . त्यातून वारंवार अपघात घडत आहेत, याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरात लवकर या रस्त्यांची डागडुजी व्यवस्थित करावी अन्यथा आपण सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग पेडणे कार्यालयासमोर एक दगड ठेवून त्या दगडाची पूजा करणार असा इशारा पेडणे तालुका बहुजन समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर यांनी दिला.
पोरस्कडे नईबाग या रस्त्याची चाळण झाली. तर दुसऱया बाजूने तोरसे येथील राष्ट्रीय महामार्ग 66 तोरसे सरकारी हायस्कूल जवळ मागच्या महिन्यात अपघात होऊन या अपघातात आईसहित एक बालक ठार झाला होता. तो रस्ता अजूनही जैसे थे स्थिती ठेवण्याचं काम एम व्ही. आर कंपनीच्या कंत्राटदाराने केलेले आहे. अपघात झालेल्या ठिकाणी खडी आणून ओतली माञ गेले एक महिना जैसे थे आहे. आठ दिवसाच्या आत रस्त्याचं काम हाती घेतलं गेलं नाही आणि गावातील रस्त्यावरील जे खड्डे आहेत, ते खड्डे व्यवस्थित बुजवले गेले नाही, तर आपण सार्वजनिक बांधकाम खाते पेडणे रस्ता विभागाच्या कार्यालयासमोर एक दगड ठेवून त्या दगडाची पूजा करून आंदोलन करण्याचा इशारा उमेश तळवणेकर यांनी दिला आहे.
एका बाजूने मांदे मतदारसंघातील रस्त्यांचं खोदकाम मोठय़ा प्रमाणात सध्या सुरू आहे. विजेचे भूमिगत केबल घालण्यासाठी रस्ते खणले जातात रस्ते करण्यासाठी कुणाचा विरोध नाही. परंतु ते व्यवस्थित बुजवले जात नाही. मातीचे ढिगारे तसेच ठेवले जातात आणि अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे हा परिसर चिखलमय होतो. आणि त्याचे परिणाम म्हणून अपघातही घडतात. मांदे या ठिकाणी आसकावडा येथे एका महिलेला आपला जीव याच धोकादायक रस्त्याच्या खड्डय़ामुळे गमवावा लागला. आणि ही घटना 22 रोजी सकाळी नऊ वाजता घडली आहे. तर तोरसे येथील जो राष्ट्रीय महामार्ग 66 आहे त्या ठिकाणी एक धोकादायक खड्डा होतो त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचे दिशा फलक नसल्याने दुभाजकवरही फलक लावला गेला नसल्याने मागच्या वेळी आई सहित एक छोटे बालकाला आपला जीव गमवावा लागला. हे अपघात वारंवार घडत आहे. या अपघातावर जर नियंत्रण सरकारने मिळवले नाही तर आपण सरकारच्या विरोधात निषेधार्थ आगळय़ावेगळय़ा पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन समाजाचे नेते उमेश तळवणकर यांनी आज पोरस्कडे नईबाग आणि तोरसे राष्ट्रीय महामार्गाकडे भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतल्यानंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना इशारा दिला.
सरकार रस्त्याबाबत असंवेदनशील : उमेश गाड
यावेळी बोलताना मोपाचे माजी पंचसदस्य म्हणाले की राष्ट्रीय महामार्ग धारगळ ते पञादेवी या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांचे बाळी गेले. हे अपघात रस्ता बांधकाम कंपनीच्या हलगर्जी पणामुळे झाले.एक महिन्यापूर्वी तोरसे येथे अपघात होऊन आई व लहान मुल यांचा बळी गेले.याठिकाणी रस्ता खोदून ठेवल्याने वळविल्याने हा अपघात झाला.दिशा दर्शक फलक नसल्यामुळे हा अपघात झाला होता.माञ आता हे सर्व होऊन परत याठिकाणी रस्ता बांधकाम कंपनी हा रस्ता सुरळीत करण्यासाठी कोणत्याच प्रकारे हालचाल करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सरकार रस्ता अपघाताबाबत ऐवढे असंवेदनशील का असा प्रश्न केला.