प्रतिनिधी /वाळपई
उत्तर गोव्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱया अंजुणे धरणाच्या प्रकल्पामध्ये पाणी साठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. या धरणाची किरकोळ दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यामुळे जलाशयात पाण्याचा साठा निर्माण होणार आहे. यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष दखल घेण्यात येणार असून या संदर्भात यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती धरणाच्या सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे.
उत्तर गोव्यातील केरी पंचायत क्षेत्रातील अंजुणे येथील धरण प्रकल्पात पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा करण्यात येत असतो. हे पाणी उत्तर गोव्यातील अनेक भागांमध्ये पिण्यासाठी व जलसिंचनासाठी वापरण्यात येत असतो. यामुळे हजारो चौरस मीटर जमीन या पाण्याच्या साठय़ामुळे लागवडीखाली आलेली आहे. पावसाळय़ात पाण्याची पातळी 93 मीटरवर पोचल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून क्षमतेपेक्षा जास्त उपलब्ध असलेल्या पाण्याचा विसर्ग केला जातो.
यंदा धरण प्रकल्पाची किरकोळ दुरुस्ती करण्यात आले होती. ज्या ठिकाणी पाण्याची गळती होते, त्याठिकाणी पॅचिगचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्णत्वास आलेली आहे. यामुळे सध्यातरी धरण प्रकल्प जलाशयात पाण्याचा साठा करण्यासाठी सज्ज झालेला आहे.
या पाण्याचा साठा केरी ,मोर्ले, पर्ये आदी भागातील जलसिंचनासाठी वापरण्यात येत असतो. त्याचप्रमाणे सांखळी व पडोसे येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आल्याने संबंधित भागात पिण्यासाठी वापर होतो.