पाचक्या दिवशीही वीजपुरवठा ठप्प, समस्या जैसे थे
प्रतिनिधी /बेळगाव
माळी गल्ली व कामत गल्ली येथे मागील चार ते पाच दिवसांपासून उच्चदाबाने वीजपुरवठा होत होता. यामुळे मोठय़ा प्रमाणात विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून अद्याप कोणत्या ठिकाणी बिघाड झाला हे समजू शकलेले नाही. यामुळे पाचव्या दिवशीही दुरुस्तीचे काम सुरूच ठेवल्याने वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
उच्च विद्युतदाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत उपकरणे जळाली. विद्युत मोटारी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, बल्ब, टय़ूबलाईट यांचे नुकसान झाले. मागील 4 दिवसांपासून दररोज हेस्कॉम कर्मचाऱयांकडून या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येत आहे. परंतु अद्याप बिघाड कोठे झाला हे न समजल्याने सोमवारी भरपावसातही दुरुस्तीचे काम सुरूच होते.
माळी गल्ली व कामत गल्ली येथील अनेक घरांमध्ये विद्युत साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोबाईल चार्जिंगला लावल्यास तो निकामी होईल ही भीती नागरिकांमध्ये आहे. यामुळे स्थानिक व हेस्कॉम कर्मचाऱयांमध्ये वादावादीचे प्रकार घडत असून हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पावसामुळे कामात व्यत्यय
दुरुस्तीसाठी परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. यामुळे व्यवसाय व उद्योगांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. सोमवार सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येत होता. पाऊस काही प्रमाणात कमी झाल्यावर दुरुस्तीचे काम करण्यात येत होते.