हिंदू राष्ट्र-जागृती सभेत मागणी
बेळगाव : सन 2009 मध्ये वक्फ बोर्डाकडे 4 लाख एकर असलेली भूमी आज 8 लाख 60 हजारहून अधिक एकर झाली आहे. एवढी भूमी वक्फ बोर्डाकडे कशी आली? वक्फ कायदा रद्द केला नाही, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल. भारतात चालू असलेला सर्वांत मोठा ‘लॅण्ड जिहाद’रूपी कायदा रद्द करण्यासाठी हिंदूंना संघटितपणे आवाज उठवावा लागेल, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाड्यो यांनी केले. भारतनगर, शहापूर येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलत होते. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाड्यो, हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक नीलेश सांगोलकर, तसेच रणरागिणी शाखेच्या बेंगळुऊ जिल्हा समन्वयक भव्या गौडा यांनीही मार्गदर्शन केले. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर चैतन्य छत्रे व सहकारी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा बेळगाव जिल्हा समन्वयक हृषिकेश गुर्जर यांनी मांडला. सूत्रसंचालन किरण दुसे आणि दिव्या शिंत्रे यांनी केले. कालमहिम्यानुसार वर्ष 2025 ला कलियुगांतर्गत सत्ययुग म्हणजेच हिंदू राष्ट्र येणार आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची पहाट पाहण्यासाठी साधना करून धर्माचरणी व्हा, असे आवाहन संस्थेच्या स्वाती खाड्यो यांनी केले. अधिवक्ता नीलेश सांगोलकर म्हणाले, दक्षिण भारतातील एकूण 1 लाख 18 हजार मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. निधर्मी शासनाचा हिंदुंच्या मंदिरात हस्तक्षेप का? बेळगाव शहरातील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरासह जिह्यातील 49 मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासंबंधी धर्मादाय विभागाने नोटीस दिली आहे. अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर व्यवस्थापन समिती नियुक्ती करण्याच्या नोटिसा कधी देण्यात आल्या आहेत का? असा प्रŽही त्यांनी उपस्थित केला.