अॅड. एन. आर. लातूर यांचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
कागवाड तालुक्यातील गवंडी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सेंट्रिंग, पेंटींग, कार्पेंटर आदी कामगारांना सरकारी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी कामगार खात्याच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. कागवाड येथील अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सरकारी सवलतींपासून कामगार वंचित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शनिवारी कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली संतोष मिरजी आदींसह कागवाड तालुक्मयातील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. राजकीय हस्तक्षेपाला अधिकाऱ्यांनी बळी पडू नये. पहिली ते पाचवीपर्यंतच्या कामगारांच्या मुलांसाठी किट देण्याची घोषणा सरकारने केली आहे. कागवाड तालुक्मयात अद्याप किटचे वाटप झाले नाही.
कागवाड हा नवा तालुका आहे. हेतूपूर्वक कामगारांना सरकारी योजनांपासून दूर सारण्यात येत आहे. अधिकारीच याकामी आघाडीवर आहेत. कामगारांच्या समस्यांचे निवारण केले जात नाही. त्यामुळे सरकारी योजना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे. योजनांची माहितीही अधिकारी कामगारांना देत नाहीत, असा आरोपही करण्यात आला आहे.
कागवाड हा स्वतंत्र तालुका असल्यामुळे कामगार विभागाची स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात यायला हवी होती. मात्र, अद्याप या तालुक्मयातील कामगारांसाठीच्या सोयीसुविधा अथणी तालुक्मयाला मिळत आहेत, याची चौकशी व्हावी. दहावीत 600 हून अधिक गुण मिळविलेल्या कामगारांच्या मुलांना टॅब किंवा लॅपटॉप देण्याची घोषणा झाली आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करूनही ही सुविधा कामगारांच्या मुलांना उपलब्ध करून दिली गेली नाही.
अतिवृष्टी व कृष्णेच्या आलेल्या पुरामुळे कामगारांच्या घरांची पडझड झाली आहे. अनेक घरे मोडकळीस आली आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घरांसाठी असलेल्या योजनांसाठीचा लाभही कामगारांना मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती मिळत नाही म्हणून संघटनेच्यावतीने हे कार्य केले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.