बेळगाव : विजयनगर, विनायक नगर, रक्षक कॉलनी, सिंधी कॉलनी परिसरामध्ये गटारी, नाला, रस्त्यांची समस्या निर्माण झाली. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापौर सविता कांबळे या परिसराच्या नगरसेविका विणा विजापुरे यांनी पाहणी केली. यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्याचा पाढाच वाचला. गटारींचे पाणी निचरा होण्यासाठी सीडीची आवश्यकता होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या सिडीचे कामच करण्यात आले नाही. त्यामुळे गटारीमधील पाण्याचा निचरा होणे अशक्य झाले. याचबरोबर रस्तेदेखील खराब झाले आहेत. तेव्हा रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी पुरवठाही वेळेत केला जात नाही. त्यामुळे पाण्याची समस्याही गंभीर बनली आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, हा सर्व परिसर उंच टेकडावर असल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा अधिक दाबाने पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आले आहे. या सर्व समस्या ऐकून घेऊन त्यावर निश्चितच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Previous Articleसर्वपक्षीय कमिटीत स्थलांतराबाबत निर्णय घेणार
Next Article राजहंसगडावरील कड्याची माती पावसामुळे कोसळली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.