वार्ताहर /खानापूर
खानापूरमार्गे गोव्यात होणारी बेकायदेशीर चोरटी गो-मांस वाहतूक व गायींची तस्करी बंद करण्यात यावी. संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व सहकाऱयांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन देऊन केली. बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अनमोड, साखळी, महाराष्ट्र, कारवारमार्गे गोव्यात गो-मातेची व गो-मांसची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असून बकरी-ईद सण काही दिवसांवर आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असते. यासाठी गोव्याच्या सीमावर्ती चेकनाक्मयांवर कडक तपासणी हाती घेण्याचे आदेश बजावावेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील अनेक मंदिरांची तोडफोड करण्यात आली असून त्या सर्व मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंडित ओगले यांच्या कार्याचे कौतुक केले. खानापूर तालुक्मयात गो-शाळा निर्माण करा, याला आपले सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी अभिजीत चांदीलकर, किरण तुडयेकर, ज्ञानेश्वर देवलतकर, अमर दोडमणी उपस्थित होते.