वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातील वाहनांच्या किरकोळ विक्रीत यावर्षीच्या ऑगस्टमध्ये 8.31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्व प्रमुख विभागांमध्ये वाढलेल्या वाहनांच्या नोंदणीमुळे ही वाढ झाल्याचे ऑटो कंपन्यांच्या संघटनेने सांगितले.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2022 मध्ये देशातील वाहनांची एकूण किरकोळ विक्री 15,21,490 युनिट्स होती. ऑगस्ट 2021 मध्ये ही आकडेवारी 14,04,704 इतकी राहिली असल्याची नेंद करण्यात आली आहे.
याचदरम्यान प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 2,74,448 युनिट्स झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 6.51 टक्के वाढ आहे. ऑगस्ट 2021 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री 2,57,672 युनिट्स होती. दुचाकींची किरकोळ विक्रीही ऑगस्ट 2022 मध्ये 8.52 टक्क्यांनी वाढून 10,74,266 युनिट्सवर पोहोचली.