प्रतिनिधी/ सातारा
दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय स्तरावरील ‘थल सैनिक पॅंप’ साठी महाराष्ट्र संघात एन.सी.सी. छात्रसैनिक अंडर ऑफिसर ऋतुजा खताळ हीची निवड झाली आहे. ऋतुजा ही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्राr कॉलेजची विद्यार्थीनी आहे. थल सैनिक पॅंप हा प्रजासत्ताक दिन परेड प्रमाणेच एन. सी. सी. मधील अत्यंत सन्मानाचा पॅंप समजला जातो. यात भारतातील सर्व राज्यांतून 17 एनसीसी डायरेक्टोरेट मधून प्रत्येकी 33 छात्रसैनिक सहभागी होतात.
छात्रसैनिकांना थल सेनेच्या विविध घटकांमध्ये प्राविण्य प्राप्त व्हावे व त्यांच्यामध्ये सैनिकी नेतृत्व निर्माण व्हावे यासाठी देशपातळीवर राज्यांच्या अंतर्गत स्पर्धा आयोजित केली जाते. ऋतुजा खताळ हीने बटालियन स्तरापासूनच कोल्हापूर ग्रुप व इंटरग्रुप स्पर्धा अशा विविध प्रत्येकी बारा दिवसांच्या आठ पॅंप मध्ये अव्वल कामगीरी करीत दिल्ली पर्यंत मजल मारली आहे.
तीच्या या यशासाठी 22 एनसीसी बटालियनचे कमांडींग अधिकारी कर्नल दीपक ठोंगे, ऍडम अधिकारी कर्नल एम. व्ही. भालसिंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, प्रा. स्वप्नील औटे तसेच बटालियनचे सुभेदार मेजर सतिश तापसे, ट्रेनिंग देणारे सर्व स्टाफ यांचे योगदान लाभले. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ऋातुजा ही निवड होने आमच्या महाविद्यालयासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. मागील वर्षी ही सुमित साळुंखे याची ही दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी गेला होता व त्यावेळी त्याला प्रायमिनिस्टर बॅनर घेऊन जाण्याचा मान ही त्याला मिळाला होता. अशा प्रकारे सलग दोन वर्ष आमच्या महाविद्यालयाला हे यश मिळाले आहे. एनसीसीच्या माध्यमातुन घडणारे विद्यार्थी हे एकंदरीतच सैन्य भर्तीसाठी तयार होतात
प्रा.डॉ.कॅप्टन महेश गायकवाड
लाल बहाद्दुर शास्त्री महाविद्यालय सातारा