पाऊस लांबल्यास नदीकाठावरील शेतकरी, नागरिकांची होणार अडचण : चित्री जलाशयातून पाणी सोडण्याची मागणी
प्रतिनिधी / संकेश्वर
चित्री जलाशयातून करण्यात येणारा पाणी पुरवठा थांबवल्यामुळे हिरण्यकेशी नदीने तळ गाठला आहे. पाऊस लांबल्यास आगामी आठवडाभरात पाण्याअभावी हिरण्यकेशी कोरडी पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीपाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचा उपयोग शेती, जनावरांना पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी केला जात आहे. पण पात्राने तळ गाठल्याने आगामी आठवडाभरात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
सलग दोन वर्षे पावसाळी हंगामात चांगली साथ मिळाल्याने नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी होते. तसेच परिसरातील विहिरी, कूपनलिकांचीही पाणीपातळी चांगली होती. चित्रीच्या पाण्यामुळे हिरण्यकेशी नदीकाठावरील नागरिकांना पाण्याची सोय झाली आहे. यंदा कडक उन्हाळा असल्याने शेती पिकांना नेहमी पाण्याची गरज भसत होती. त्यातच भाजीपाला आणि ऊस क्षेत्रातही वाढ झाल्याने पिकांना नेहमी पाणी द्यावे लागत आहे.
दरम्यान हिरण्यकेशी नदीतून काठावरील शेतकऱयांतून मोठय़ा प्रमाणात पाणी उपसा होतो. यामुळे सध्या चित्री जलाशयातून होणारा पाणी पुरवठा थांबल्याने नदीने तळ गाठला आहे. आगामी आठवडाभरात हिरण्यकेशी पाण्याअभावी कोरडी पडण्याची शक्मयता आहे. यामुळे नदी काठावरील पिके पाण्याअभावी धोक्मयात येण्याची शक्मयता आहे. यासाठी गत आठवडय़ात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाप्रमाणे हजेरी लावल्यास शेतकऱयांना सोयीस्कर ठरणार आहे. अन्यथा पिके करपून जाण्याची शक्मयता आहे. तसेच सोयाबीन पेरणीसाठी पाण्याची गरज आहे. अनेक शेतकरी नदीच्या पाण्यावर पावसाळय़ापूर्वीच पेरणी करतात. मात्र नदीच कोरडी पडल्याने अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे शेतकऱयांतून नाराजी आहे.
पाऊस, चित्रीच्या पाण्यासाठी साकडे
पावसाला प्रारंभ होण्यापूर्वी हिरण्यकेशी नदीकाठावरील शेतकरी, नागरिक आणि जनावरांच्या पाण्याची सोय करण्यासाठी चित्री जलाशयातून नदीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. अंतिम टप्प्यातील पाणी सोडल्यास पिकांना जीवदान मिळण्याबरोबरच शेतकऱयांना आर्थिक फटका बसणार नाही. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. याची दखल घेत संबंधितांनी पाणी सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.