घटनेने एकच खळबळ :48 तोळे सोन्याचे दागिने लांबविले : गोकाक पोलिसात घटनेची नोंद
प्रतिनिधी/ बेळगाव
गोकाक तहसीलदारांच्या घरात धाडसी चोरी झाली असून बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 25 लाख ऊपये किमतीचे दागिने पळविले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली असून गोकाक शहर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शनिवार 10 रोजी रात्री चोरीची घटना घडली असून सदर प्रकार रविवार 11 रोजी दुपारी उघडकीस आला.
गोकाक येथील लोकोपयोगी विभागाच्या पीडब्ल्युडी कॉलनीत तहसीलदार प्रकाश होळेप्पगोळ यांचे निवासस्थान असून ते म्हैसूर येथे होणाऱ्या निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. तर कुटुंबातील अन्य सदस्य हे हुबळी येथील नातेवाईकांकडे गेले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून मोठ्या प्रमाणात दागिने पळविले आहेत.
तिजोरीतील 48 तोळे सोने, 200 ग्रॅम चांदी व 4 हजार ऊपये रोख रक्कम असा सुमारे 25 लाख ऊपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. घटनेची माहिती समजताच गोकाकचे पोलीस निरीक्षक गोपाल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
रविवारी सकाळी तहसीलदारांच्या गाडीचा चालक बंगल्याकडे आल्यानंतर त्यांना गेटचे कुलूप व मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ सदर घटनेची माहिती तहसीलदारांना फोनवऊन कळविली. चोरीच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने बंगल्याच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी गोकाकचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय गोपाळ राठोड, पीएसआय एम. डी. घोरी व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपासासाठी बेळगावहून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद गोकाक शहर पोलिसात झाली असून पुढील तपास सुऊ आहे.
विशेष पथकाची स्थापना
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. सोमवारी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी हे गोकाकला भेट देणार असून याचवेळी चोरीच्या तपासासाठी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार एक महिन्यापूर्वी तहसीलदारांच्या कार्यालयातही चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी संगणक चोरले होते. आता त्यांच्या घरातही चोरीची घटना घडली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा असून अडचण नसून खोळंबा
गोकाक शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून दरोडा, चोरी व चेन स्नॅचिंगचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस व नगर प्रशासनाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवर व कार्यालयांबाहेर सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात आले आहेत. असे असतानाही चोरीच्या घटनांमुळे यंत्रणेविषयी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.