रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढल़े. चिपळूण, खेड, राजापूर येथील काही रहिवासी भागात पाणी शिरले आह़े. तर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. काजळी व जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आह़े. पुढील 24 तासात कोकण किनारपट्टीवर ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्यासह अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल़ा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून एनडीआरफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आह़े. एनडीआरफचे 20 जवान व श्वान पथक चिपळूण शहरात दाखल झाले आहेत.