मानवाच्या कल्याणासाठी झाड लावली गेली पाहिजेत, अभिनेते मनोज वाजपेयी यांनी मांडले मत, वृक्ष प्रसाद योजनेचा अवलंब सर्वांनी करण्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांचे आवाहन
सातारा- प्रतिनिधी
एका वेळे गावचा तरुण मुंबईसारखा ठिकाणी जातो. तेथे अभिनयात आपले नाव करतो. गावी परत येतो ते सह्याद्री देवराई वनराई प्रकल्पाची स्वप्न घेऊन, ओसाड माळावर झाडे लावण्याचा आणि हिरवे गार डोंगर करण्याचा संकल्प घेऊनच. हा सह्याद्री देवराई वनराई प्रकल्प केवळ महाराष्ट्रात नवे तर देशात रोल मॉडेल ठरेल असा विश्वास अभिनेते मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष प्रसाद योजनेचे महत्व सांगितले.
Video पहा- सह्याद्री देवराई वनराई प्रकल्प देशात रोल मॉडेल ठरेल – अभिनेते मनोज वाजपेयी
गोळीबार मैदान येथील सह्याद्री देवराई वनराई प्रकल्पास अभिनेते मनोज वाजपेयी यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांचे स्वागत सातारच्या हटके पध्दतीने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अभिनेते सयाजी शिंदे, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, माझी आणि सयाजी शिंदे यांची भेट केरळ येथे चित्रीकरणावेळी पडली. त्यांच्यात एक वेगळीच काम करण्याची उर्मी मला जाणवली आणि माणूस काळजाला भिडला. एका छोट्या गावातून अभिनयाच्या वेडापायी मुंबई गाठतो. मुंबईत अभिनयात नाव त्यांनी केले. अभिनयाबरोबरच त्यांच्यात वृक्षारोपण करण्याचा एक वेडेपणा आहे. ते गावाला येऊन सह्याद्री देवराई वनराई करण्याचा संकल्प करून येतात. मी जेव्हा जेव्हा फोन करतो चौकशी करतो तेव्हा तेव्हा ते सह्याद्री देवराई वनराईमध्ये असल्याचे सांगतात. मी सदैव त्यांच्या या कार्यात आहे. सद्या आपण पाहता की पृथ्वीवर पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतो आहे. हे जर कोठे थांबवायचे असेल कुठे रोखायचे असेल तर झाडे लावली पाहिजेत., ही काळाची गरज आहे. तेच काम अभिनेते सयाजी शिंदे हे करत आहेत.त्यांचे जे काम सुरू आहे ते केवळ महाराष्ट्र नाही तर देशात रोल मॉडेल ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, वृक्ष प्रसाद योजनेचा शुभारंभ कोल्हापूर येथे होत आहे. त्या योजनेनुसार वृक्ष चळवळ वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मै थोडा पागल टाइप का था…
मनोज वाजपेयी यांनी केबीपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की, आपण युवकांना काय प्रेरणा द्याल, तुमचे पॅशन काय आहे?, त्यावर ते म्हणाले, आजचे युवक मोठे होऊ लागले आहेत. माझ्या 11 वर्षाच्या मुलीने मला प्रश्न केला की बाबा तुमच्या तरुण पणात झाडे होती का?, आता का दिसतं नाहीत. या तिच्या प्रश्नावर तिला उत्तर दिले. झाडे लावली पाहिजे ही काळाची गरज आहे. आपले सयाजी शिंदे हे वृक्ष चळवळ चालवतात. तेच पॅशन आहेत. ते सह्याद्री देवराई वनराई साठी तीन महिने राबत होते. युवकांनी प्रत्येक वर्षी झाडे लावली पाहिजे, झाडांना जगवल पाहिजे, असे सांगत ते म्हणाले, मी थोडा पागल टाइप का था. माझं प्रेम अभिनयावर आहे. 12 व्या वर्षांपासून ते आज पर्यंत राहिले आहे. मला त्याच्याशिवाय शांती नाही मिळत, असे त्यांनी सांगितले.
सह्याद्री देवराईच्या नावाने चांगभलं
केबीपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सह्याद्री देवराई वनराईचे गीत सादर केले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या नावाने चांगभलं अशा घोषणा दिल्या, आणि कार्यक्रमात रंगत आली.