वाघांची संख्या वाढवता येणे शक्य : सह्याद्री व्याघ्र प्रेमी आशावादी : वाढणाऱ्या वाघ संख्येमुळे विदर्भात जागेची अडचण : त्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्नांची गरज
संतोष पाटील/कोल्हापूर
राधानगरी अभयारण्यात चार दिवसांपूर्वी पट्टेरी वाघ कॅमेराबद्ध झाला. कोल्हापूर जिह्यातील जंगलात वाघांचा अधिवास म्हणजे येथील परिसर परिपूर्ण निसर्गसंपन्न असल्याचे लक्षण आहे. वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये सध्या 18 वाघ व्यवस्थित राहू शकतात. या प्रकल्पात सध्या ट्रॅप झालेला एक आणि वस्तूनिष्ठ पुराव्या आधारे वास्तव्य सिद्ध झालेले सात वाघ आहेत. या ठिकाणी आणि भविष्यात या प्रकल्पामध्ये असणाऱया उरलेल्या गावांचे पुनर्वसन करुन योग्य ती काळजी घेतल्यास या प्रकल्पात सुमारे 30 वाघांचे अस्तित्व करण्याच्या दृष्टीने शासन विचार करत आहे. विदर्भात असलेले पाच व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात वाढणाऱया वाघांची संख्या पाहता भविष्यात अपुरी पडणार आहेत. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या काळात वाघांची संख्या वाढणार आहे. या प्रकल्पाकडे व्याघ्रप्रेमी आशावादी नजरेने पाहत आहेत.
वन्यजीव संस्था डेहराडूनच्या अभ्यासानुसार सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये सध्या 18 वाघ व्यवस्थित राहू शकतील इतका स्पेस आहे. या प्रकल्पात सध्या ट्रप झालेला एक आणि वस्तूनिष्ठ पुराव्या आधारे वास्तव्य सिद्ध झालेले सात वाघ आहेत. याठिकाणी आणि भविष्यात या प्रकल्पामध्ये असणाऱया उरलेल्या गावांचे पुनर्वसन करून योग्य ती काळजी घेतल्यास या प्रकल्पात सुमारे 30 वाघांचे अस्तित्व करण्याच्या दृष्टीने शासन विचार करत आहे. विदर्भात असलेले पाच व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात वाढणाऱया वाघांची संख्या पाहता भविष्यात अपुरे पडणार आहेत. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या काळात वाघांची संख्या वाढणार आहे. या प्रकल्पाकडे व्याघ्रप्रेमी आशावादी नजरेने पहात आहेत.
कोयना, चांदोलीपासून राधानगरी अभयारण्यापर्यंत पश्चिम घाट माध्यावर सह्याद्री व्याघ्रप्रकल्प वसलेला आहे. चांदोली-कोयना अभयारण्य 1156 हेक्टर तर राधानगरी अभयारण्य 431 हेक्टर आहे. कोयना ते राधानगरी आणि खाली दक्षिणेत तिलारीपर्यंत पश्चिम घाट माथा हा वाघांचा परिक्रम मार्ग आहे. कर्नाटकात पश्चिम घाट माथ्याची रुंदी काही ठिकाणी 100 किलोमिटर इतकी आहे. मात्र महाराष्ट्रात ती चिंचोळी असून काही ठिकाणी फक्त पाच ते दहा किलोमिटर आहे. वाघांना नैसर्गिक अधिवासातून प्रवास करताना चिंचोळा मार्ग अडचणीचा ठरत आहे.
अभ्यासानुसार तिलारी हा भाग वाघांचा उगमस्त्राsत मानला जातो. तेथून मोठी झालेली पिल्ले गोवा कर्नाटक आणि सह्याद्री व्याघ्र राखीव या भागात प्रस्थापित होतात. अवैध वृक्षतोड तसेच शाहूवाडी तालुक्यातील खाणी विकास प्रकल्प आणि वनक्षेत्रलगत कोकणात शेतीमध्ये रबर आणि अननस या व्यापारी तत्त्वावर लागवड हे वाघांच्या अधिवास व स्थलांतर मार्गावर अडथळे बनत आहेत. त्यामुळे वाघांच्या परिक्रमेत अडचण येते. जंगलाच्या सानिध्यात असणाऱया चार गावांचे पुर्नवर्सन करुन वाघांचा भ्रमण मार्ग आणि अधिवास अधिक सक्षम करण्यावर वन विभाग जोर देणार आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघाबरोबरच बिबटय़ा आणि जंगली कुत्र्यांची वाढणारी संख्या वाघांना खाद्य मिळविण्याच्या शर्यतीत एक अडथळा आहे. यासाठी सागरेश्वर अभयारण्य व कात्रज येथील सांबर आणि चितळ सोर्स पॉप्युलेशन म्हणून वापर करण्याचा विचार आहे. विपुल प्रमाणात जैवविविधता असणाऱया सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे भविष्यातील वाघांचे भवितव्य म्हणून पाहता येईल.
कोल्हापूर नैसर्गिकदृष्टय़ा संपन्न
अन्न साखळीत सर्वोच्च स्थान असलेल्या वाघाची इंडीयन इन्स्टिटय़ुट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेने अभ्यासअंती पर्यावरणीयदृष्टय़ा किंमत तब्बल 18 कोटी रुपये केली आहे. यावरुन वाघांचे पर्यावरणीय महत्व अधोरेखित होते. कोयना-चांदोलीपासून तिलारीपर्यंतच्या सह्याद्री खोऱयात तब्बल 12 वाघांची नोंद आहे. राज्यात 312 वाघ असून महाराष्ट्र राज्यात चौथ्या स्थानी आहे. जगाच्या तुलनेत भारतात 70 टक्के वाघ आहे. वाघांचे अस्तित्व असेल तर त्या परिसरात जंगल तोड होत नसल्याचे आकडेवारी दर्शवते. वृक्ष संवर्धन झाल्याने पशू पक्षांची पैदास मोठय़ा संख्येने होते. पाऊस चांगला पडतो. जमिनीची धूप थांबते. वाघांचा अधिवास असल्याने कोल्हापूर हे नैसर्गिकदृष्टय़ा संपन्न मानले जाते.
सुमारे तीन हजार वाघ
भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यावतीने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना 2006 मध्ये झाली. तेव्हा देशात 1411 वाघ होते, 2010 मध्ये दुसरी गणना झाली तेंव्हा 1706 तर 2014 मध्ये तिसरी गणना झाली तेव्हा देशात 2226 वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता 2967 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात 2006 साली 103 वाघ होते. ते 2010 मध्ये वाढून 168 झाले. 2014 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून 190 झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे 65 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 312 इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. प्रथम क्रमांकावर असलेले मध्यप्रदेश मध्ये राज्यात वाघांची संख्या 526 आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या 524 आहे. उत्तराखंडात 442 आहे.
एका वाघाची किंमत 18 कोटी रुपये
अंधश्रध्दा आणि पोकळ भितीपोटी वाघाची शिकार केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात एका वाघाची किंमत कोटय़वधी रुपये आहे. मात्र पर्यावरणीयदृष्टय़ा एक वाघ 18 कोटी रुपयांचे मुल्याचा मानला जातो. वाघांमुळे जंगलांचे होणारे संवर्धन, त्यामुळे पडणारा पाऊस, त्यावर वाढणारी शेती, वाघांमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन होणारे वन्य जीवांचे रक्षण आदींची किंमत 18 कोटी इतकी असल्याचे इंडीयन इन्स्टिटय़ुट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेन्ट या संस्थेने अभ्यासाअंती सांगितले आहे.
इथे आहेत व्याघ्र प्रकल्प
देशात 18 राज्यात तब्बल 3 लाख 78 हजार 118 किलोमीटर जंगल भूभागात वाघांचे अस्तित्व आहे. भारतात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, राजस्थानात रणथंभोर व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात भोर, मेळघाट, पेंच, वेगाव नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा-अंधेरी हे व्याघ्र प्रकल्प आहेत.