दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकरी एकवटणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त किसान मोर्चाने 20 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महापंचायत बोलावली आहे. सकाळी 10 ते दुपारी 3:30 या वेळेत येथे शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. यादरम्यान शेतकरी एमएसपीसारख्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. तसेच कृषी क्षेत्रात कोणत्याही प्रकारची परकीय गुंतवणूक थांबली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
संयुक्त किसान मोर्चा दिल्लीतील रामलीला मैदानावर तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा महापंचायत घेत आहे. राजधानीत शेतकऱ्यांना एकत्रित करून केंद्र सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आता दिल्लीत पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची ऊपरेषा तयार केली जात आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी केंद्र सरकारकडे कर्जमाफीची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आपल्या सर्व जुन्या मागण्यांचा पुनऊच्चार केला आहे. 20 मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर सकाळी 10 ते दुपारी 3.30 या वेळेत शेतकरी जमणार आहेत. या सभेला हजारो शेतकरी पोहोचणार आहेत. शनिवारपासूनच अनेक शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.