प्रतिनिधी /मडगाव
कोलवा समुद्रकिनाऱयावर वाळूची धूप होत असून समुद्रकिनाऱयावरील सौंदर्यीकरणा धोका निर्माण झालेला आहे. समुद्रकिनाऱयावरील बरीच वाळू वाहून गेली असून पाण्याचा प्रवाह आतमध्ये येऊ लागला आहे.
समुद्रकिनाऱयाच्या आधी जमिनीच्या बाजूने समुद्रकिनाऱयाची वाळू आहे आणि नंतर आता पाण्याचा प्रवाह पोचला आहे. त्यामुळे वाळूची धूप होत आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी सौंदर्यीकरण केले होते. त्याला हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समुद्रकिनाऱयावर सौंदर्यीकरण करताना संभाव्य परिस्थितीचा अभ्यास केला नव्हता का असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे.
समुद्रकिनाऱयावरील काँक्रिटीकरण व शासनाच्या अन्य प्रकल्पांच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर कोलवा नागरी ग्राहक मंचाचा कार्यकर्त्या जुडिथ आल्मेदा यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाने केवळ सरकारी तिजोरीचेच नुकसान केलेले नाही तर पर्यावरणाचाही ऱहास केल्याचा आरोप केला आहे.
श्रीमती आल्मेदा पुढे म्हणाल्या की, जीटीडीसीला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आधीच नो डेव्हलपमेंट झोन (एनडीझेड) मध्ये काँक्रीट ओतण्याविरूद्ध चेतावणी दिली होती. तरीही या ठिकाणी काँक्रिटची कामे करण्यात आलेली आहे. वाळूची धूप रोखण्यासाठी आणि गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱयांवर खाजगी गटांना काँक्रीटच्या भिंती बांधण्यास परवानगी दिल्याबद्दल सरकारवर टीका होत आहे.
अलीकडेच सदोष पथदिवे, कोलवा खाडीत सोडल्या जाणाऱया सांडपाण्याचा न सुटलेला प्रश्न आणि इतर समस्यांकडे लक्ष वेधणाऱया आल्मेदा यांनी पुढे निदर्शनास आणले की, सरकारने बांधलेले काँक्रीटचे टॉयलेट ब्लॉक गोव्यातील पहिले तरंगणारे टॉयलेट ब्लॉक होण्यापासून अवघेच मीटर दूर आहेत. ज्याप्रकारे सौंदर्यीकरणाचे काम लवकरच पाण्यात पडू शकतात त्याप्रमाणे शौचालय देखील पाण्यात जाण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही.