जत / प्रतिनिधी
तिप्पेहळळी (ता.जत) येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या युनिट चार मध्ये कामगार असलेला गोलू कुमार विश्वनाथ शहा (वय 25, मूळ राहणार मंथिया पूर्वी चंपारन, बिहार) याने चादरीने कारखाना साईट वरील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना काल शनिवारी रात्री उशिरा घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र तो कारखान्यात तो पोती उचलण्याचे काम करत होता. मुकादम व त्याच्यात वाद झाल्याने त्याने मनास वाईट वाटून घेऊन आत्महत्या केली, अशी चर्चा होती. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले यांनी जत पोलीस ठाण्यास दूरध्वनी द्वारे कळविले आहे. अधिक तपास पोलीस नाईक हसबे करीत आहेत.