प्रशासनाकडून अद्याप पंचनामा झाला नसल्याचा आरोप, मदतीची मागणी
प्रतिनिधी / मिरज
मागील महिन्यात सलग दोन आठवडे झोपडून काढलेल्या अवकाळी पावसानंतर उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. नुकसानीचा कहर होऊनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप पंचनामेच केली नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी दिली. यावेळी मंत्री सामंत यांनी संबंधीत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्याना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यातील भोसे येथे अवकाळीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाणून मंत्री उदय सामंत यांनी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.