प्रितम निकम / शिराळा
शिराळा तालुक्यातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी चालू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वारणा धरण मध्ये २८.७८ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहॆ. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी
कोणत्या ही क्षणी नदी पात्रात २००० ते ४००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहॆ. तरी नदी काठच्या गावांना व ग्रामस्थांना दक्षतेच्या सूचना देण्यात याव्यात असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
पावसाचा जोर वाढल्याने तालुक्यातील जनजीवन थोड्या फार प्रमाणात विस्कळित झाले आहे. शिराळा तालुक्यात भुईमूग, सोयाबीन पिके जोमात आहेत. तसेच धुळवाफ भात पिकांची वाढ चांगली झाली आहे आहे. सोयाबीन व भूईमुग भात, पिकांच्या कोळपणी, भांगलणीस सुरूवात झाली आहे. गेल्या जून महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे भातासह माळरानावरील पिकांना मार बसला होता.