भाजप नेत्या नीता केळकर यांची पालकमंत्री जयंत पाटील यांचे कडे मागणी
सांगली : परिस्थिती
सांगलीकराच्या मनात पहिल्याच पावसाने धडकी भरली असून कृष्णा, वारणा काठच नाही तर जतपर्यंत या भीतीची लहर आहे. पुराचे एका मागून एक तडाखे बसले तरी सुधारणा, उपाययोजना यासाठी पावले उचलली गेली नाहीत. या पाश्वभूमीवर भाजप नेत्या नीता केळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तातडीने सर्वसमावेशक बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे.
अधिक वाचा 👉 पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्मई
https://tarunbharat.com/benglor-coordinate-maharashtra-officials-counter-threat-flooding-cm-bommai-tbdnews/
आपल्य़ा सोशलमिडिया वरिल संदेशात निता केळकर यांनी पालकमंत्र्यांना आवाहन केले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आपल्या राज्यातील पाठबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुर परीस्थितीच्या पुर्व उपाययोजनांचा आढावा घेतला असून त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सुचना केल्या आहेत. याचा दाखला देताना केळकर यांनी सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांना पुरपरिस्थिती संबंधी तातडीची आढावा बैठक घ्यावी असे सुचवले आहे.