पलुस प्रतिनिधी
निकृष्ट उन्हाळी सोयाबीन वाणमुळे (KDS 726 ) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देवून दिलासा देण्याचे आश्वासन आज बुधवारी मंत्रालयात झालेल्या कृषी खात्याच्या बैठकीत कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले. यासंदर्भात एका चौकशी समितीची स्थापना करून याबाबत सखोल अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल. आणि तद्नंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले.
सांगली सह संबंध राज्यात यावर्षी महाबीज मार्फत बीजोत्पादन कार्यक्रम आखला होता. यामध्ये हजारो शेतकऱ्यांना KDS 726 जातीचे बियाणे देण्यात आले होते. ते सर्व बियाणे सदोष असल्यामुळे रोग किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. तसेच उत्पन्न ही कमी प्रमाणात आले. यासंदर्भात धनगाव जिल्हा सांगली येथील शेतकऱ्यांनी आवाज उठविला होता. दरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी प्रभावित शेत पिकांची पाहणी करून यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजीत कदम साहेब, कृषि आयुक्त, कृषि विभागाचे सचिव, महाबीज चे अधिकारी व धनगाव चे शेतकरी प्रदीप साळुंखे, दिपक भोसले, सरपंच सतपाल साळुंखे, शरद साळुंखे आदी उपस्थित होते