मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीमध्ये विराट मोर्चा निघाला असून सांगली जिल्ह्यातून हजारो लोक एकत्र जमले आहेत. सर्वपक्षीय निघालेल्या मोर्चाचे नेर्तृत्व महिलांकडे दिले असून सांगली जिल्हाभरातून हजारो महिला या मार्चात सहभागी झाले आहेत.
हेही वाचा >>> ओबीसी जातींचे फेरसर्वेक्षण करुन प्रगत जातींना वगळा! यासह मराठा समाजाची आरक्षणाची मागणी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील राजकारण तापत आहे. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघत आहे. सकल मराठा समाज, सांगली जिल्हा, पुरस्कृत सर्वपक्षीय मराठा आरक्षणसाठी विराट मोर्चा आज सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून निघाला असून मराठा समाजाचे कार्यकर्त्यांचे जथ्येच्या जथ्ये चौकात पोहोचत आहेत.
100 वर्षीय स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांच्या हस्ते मशाल पेटवून मराठा मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाचे नेतृत्व मराठा मुली आणि महिलांकडे दिले असून त्यांचा जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, माजी मंत्री डॉ विश्वजीत कदम, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते मोर्चास्थळावर उपस्थित आहेत.