सांगली : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत झाली आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. कोसळणारा पाऊस आणि धरणातून होणार पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा नदिच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेकडून नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
सध्या कृष्णेची पाणी पातळी ३० फुट आहे. मसळधार पाऊस आणि कोयना, वारणा, राधानगरी या धरणातून सुरु असलेला विसर्ग यामुळे पातळीत वाढ होण्याची शक्य आहे. वाढत्या पाण्यामुळे कृष्णेची पाणीपातळी ३५ फुटावर जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अलमट्टी धरणाचा विसर्ग आणखी वाढवणार असल्याचे देखिल पाठबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या अलमट्टी धरणातून 2 लाख 25 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.