माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार , अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जतन करण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील गावाचा ग्रामपंचायतींचा देखील गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळा स्वीकारण्यासाठी दिघंची चे सरपंच अमोल मोरे,विकास मोरे,ग्रामसेवक रणजितसिंह रजपूत यांच्यासह प्रतिनिधी मुंबईला गेले होते.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडून घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये दिघंची ग्रामपंचायत ने राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला असून मुंबई येथे आयोजित सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच रश्मी ताई ठाकरे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यातील पुरस्कर प्राप्त ग्रामपंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत पृथ्वी, वायू, जल, जतन करण्यासाठी गावांनी केलेल्या उपक्रमामध्ये वृक्षलागवड, हरित क्रांती करणे व त्याची पूर्तता करणे तसेच विविध क्षेत्रे विकसित करणे,वृक्ष लागवड आराखडा तयार करणे, घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक विभागाचे बंदी, ई वेस्ट व्यवस्थापन, कृषी घनकचरा व्यवस्थापन, उज्वला गॅस योजना, सायकल ट्रॅक, पाणलोट विकास प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापण, पाणी बजेट, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, पाणी खोत शुद्धीकरण व सुशोभीकरण, विहीर पुनर्भर, ठिबक सिंचन प्रकल्प, सण उत्सवावेळी प्रदूषण रोखणे, धार्मिक कार्यात इकोफ्रेंडली मूर्तीचा वापर करणे, एल.ई.डी व सोलर लाईट, सोलर प्रकल्प आदी योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या दिघंची ग्रामपंचायतला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने दिघंची च्या शिरपेचात मनाचा तुरा रोवल्याचे मत सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केले. तसेच आमदार अनिलभाऊ बाबर आणी तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिघंची चा चौफर विकास साधला आहे. त्यामुळेच आज दिघंचीचे नाव राज्य पुरस्कारावर कोरले गेले आहे. यापुढे देखील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने दिघंचीचा विकासरथ असाच पुढे नेऊ असा विश्वास यावेळी सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केला.