नागरिकांनीही पर्यावरणपूरक बाबींचा अधिकाधिक वापर करावा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली/प्रतिनिधी
दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एकल वापर प्लास्टिक बंदी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्ह्यात प्लास्टिक कचरा किती संकलीत झाला याचा ताळेबंद ठेवून प्लास्टिक कचऱ्याचे मुल्यांकन, संकलन, पुनर्वापर यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
एकल वापर प्लास्टिक बंदी अंमलबजावणीसाठीची जिल्हास्तरीय कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एन. एस. औताडे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.