विधायक कामासाठी तोंडाचे भोंगे चालवा-राऊत
राज्यात परतातच सोमय्यांचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. सध्या संजय राऊत हे लडाखमध्ये आहेत. गेल्या चार दिवसांपासून संसदीय समितीचा अभ्यास दौरा करण्यासाठी राज्यातील जवळपास ३० खासदार या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. यावेळी राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, खासदार संभाजीराजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा अनेक मुद्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी सोमय्यांचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला.
सोमय्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले, सोमय्या विचार न करता वाट्टेल ते बोलतात. त्यांनी माझ्या मुलीवरही आरोप केले आहेत. मुंबईत आल्यावर त्यांच मोठं प्रकरण उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भाजपाला दान करणार
काल किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला याविषयी बोलताना ते म्हणाले, किरीट सोमय्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर,त्यांच्या पत्नीवर,कुटुंबावर, संजय राऊतांवर, त्य़ांच्या कुटुंबावर, सहकाऱ्यांवर तोंड फाटेपर्यंत बोलतात. वायनरी फॅक्टरीचा आरोप त्यांनी माझ्या मुलीवर केला. २ हजार कोटींची संपत्ती आहे असा आरोप केला. तुम्ही शोधून दाखवाच असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, जर तुम्हाला १० कोटी जरी संपत्ती मिळाली तरी तुम्हाला दान करू असेही ते म्हणाले. भ्रष्टाचार विरोधी मुखवटे लावून हे लोक खंडणी गोळा करत असतात असा आरोप त्यांनी यावेळी केला.
लेह लडाखमध्ये कम्युनिकेशन होणे गरजेचे
लेह लडाख विषयी बोलताना ते म्हणाले, लेह लडाखची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर आहे. लेह-लडाख हा वादग्रस्त प्रदेश नाही. जम्मू-कश्मिरशी आम्हाला जोडू नका असे मत येथील नागरीकांचे आहे. पॅन्गाॅंगवरील पुलाबाबत बोलताना राऊत म्हणाले, येथील आंतरराष्ट्रीय विषय केंद्राने हाताळावे. लेह लडाखमध्ये कम्युनिकेशन होणे गरजेचे आहे. देशातील घडामोडी येथील जनतेला कळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
विधायक कामासाठी तोंडाचे भोंगे चालवा
विरोधी पक्षावर टीका करताना ते म्हणाले, महाराष्टा हा विशिष्ट प्रकारचा प्रदेश आहे. त्याने देशाला कायम दिशा दिली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एक देशात आदर्श मुख्यमंत्री असतो. राज्य़ाच्य़ा नेतृत्वावर, राज्याच्या मुख्यमंत्र्यावर चिखलफेक करण, बदनाम करण हे राज्याच्या आणि देशाच्य़ा हिताचे नाही. देवेंन्द्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही त्य़ांचा कायम सन्मान केला. महाराष्ट्र हा देशाचा एक मुकुटमनी आहे. विरोधीपक्ष म्हणून तुम्ही उत्तम काम करा. निवडणूका येतील त्यावेळी परत सत्तेत कोण येईल याचा फैसला जनता करेल. आपल्याकडे लोकशाही आहे. विरोधी पक्षाचे काम आहे भोंग्याशिवाय बोलणं. विधायक कामासाठी तोंडाचे भोंगे चालत राहिले पाहिजेत. लोकांमध्ये सभ्रम निर्माण करण्यासाठी भोंगे चालवू नका असेही ते म्हणाले.
संभाजीराजेंनी मविआत याव
ज्यांना अपक्ष लढायचं असेल त्यांनी खुशाल लढाव. त्यांच्याकडे ताकद असेल,आकडा असेल तर त्यांनी खुशाल लढावं. मविआने सहावी जागा लढायची असे ठरवले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण ही राजकीय लढाई आहे. तुमच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे. यावेळी शिवसेनेचा उमेदवार राज्यसभेसाठी उभा करायचा अस पक्षप्रमुखांच म्हणण आहे. संभाजीराजेंना जर लढायच असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत यावं असेही ते म्हणाले.
राम मंदिर आंदोलनापासून अयोध्येशी संबंध
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी राऊत म्हणाल, ‘राज ठाकरे यांनी तिकडे एखादं घर घेतलं, मठ किंवा आश्रम बांधला तरी तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना आणि अयोध्येचं नातं काही आजचं नाही. हे नातं राजकीय नाही. आम्ही तिकडे सतत जात असतो. राम मंदिर आंदोलनापासून आमचा अयोध्येशी संबंध आहे.