राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आॅनलाईन टीम/तरूण भारत
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्या दर्शनाला जाणार असून इस्काॅनच्य़ा मंदिरात जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अयोध्या दौऱ्य़ाची तयारी सुरू असल्य़ाचेही त्यांनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक अयोध्येला जाणार आहेत. हा आमचा धार्मिक कार्यक्रम आहे. यात कोणतेही शक्ती प्रदर्शन नाही. जेव्हापासून शिवसेनेचे आंदोलन सुरु आहे तेव्हापासून आम्ही त्याठिकाणी गेलेलो आहोत. शिवसेनेचे आणि अयोध्येचं एक जुनं नातं आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर उध्दव ठाकरे अयोध्येला जाऊन आलेत. कोरोनाच संकट दूर झाले आहे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रभू रामचंद्राचा आशिर्वाद आम्हाला मिळाला तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथ आणखी वाढेल असेही ते म्हणाले.
…तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी जर मदत हवी असती तर आम्ही दिली असती. अयोध्येत शिवसेनेला मानणारा मोठा गट आहे. उत्तर प्रदेशची जनता नेहमीच शिवसेनेचे स्वागत करते.
महाराष्ट्रातील नेत्यांचा भाजपा वापर करतयं
भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, प्रत्येकवेळी राजकीय स्वार्थासाठी भाजपा महाराष्ट्रातील नेत्यांचा वापर करत आहे त्य़ातील हाच प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत असं का केलं? नेमकी कोणती अडचण आहे माहित नाही. काहींना खूप उशीरा आपला वापर होत आहे अस कळत. मात्र, यातून आता शहानपण घ्यावं असा टोला राज ठाकरेंना लगावला. आपला वापर केला जातोय हे नेत्यांना आता काळायला हवं असेही ते म्हणाले.
छत्रपती संभाजीराजेंनी शिवसेनेत याव
राज्यसभेच्या ६ व्या जागे संदर्भात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची इच्छा आहे की, शिवसेनेचाचं उमेदवार यासाठी असावा. छत्रपती संभाजीराजे हे सर्वांनाच प्रिय आहेत त्यांना जर शिवसेनेत यायच असेल तर नक्कीच विचार केला जाईल असा सूचक वक्तव्य त्य़ांनी यावेळी केले.