अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ मुंबई
महाविकास आघाडीचे शिल्पकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते, प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगाव पत्राचाळ प्रकरण आणि मनी लॉड्रींग प्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यात त्यांची नऊ तासाहून अधिकाकाळ चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर ईडी अधिकाऱयांनी राऊत यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी सात वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपमधील ‘मैत्री‘ बंगल्यात दाखल झाले होते. या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचे पथक दाखल झाले. यावेळी ईडी कार्यालय आणि संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्या भोवती केंद्रीय पोलीस दल (सीआरपीएफ) आणि मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यात नऊ तासाहून अधिकाकाळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीआरपीएफच्या आणखी एका तुकडीला पाचारण करण्यात आले. तर दुसरीकडे मुंबई पोलीस दलाच्या तुकडय़ा देखील तैनात करण्यात आल्या. यावेळी मोठय़ा बंदोबस्तात संजय राऊत यांना इडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर याठिकाणी त्याना अटक करण्यात येणार असल्याची माहिती ईडी अधिकाऱयानी दिली.
सात अधिकाऱयांकडून झाडाझडती
प्रथम ईडीच्या सात अधिकाऱयांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती करण्यात आली. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रे आणि दस्ताऐवज तपासले गेले. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. तर, ईडी कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशी संपल्यानंतर ईडी अधिकाऱयानी संजय राऊत यांना ताब्यात घेतले.
शिवसैनिकांची घोषणाबाजी
तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या घराबाहेर मोठय़ा प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होत, त्यानी घोषणाबाजी सुरू केली होती. मात्र याठिकाणी शिवसैनिक संतप्त होऊ नये, याकरीता, पोलीस सज्ज होते. राऊत यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मागील दरवाजा जवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेमका घोटाळा काय आहे ?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1 हजार 34 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गफहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहण़ाऱया नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याने, ईडीने मनी लॉड्रींग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे.
शिवसैनिक संतप्त
दरम्यान, संजय राऊत यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे समजताच मोठय़ा प्रमाणांत शिवसैनिक राऊत यांच्या घराभोवती जमा झाले होते. संजय राऊत याना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिकानी मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी करीत, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.मात्र मुंबई पोलिसानी वेळीच याला अटकाव केला,तर नागपूरात शेकडो शिवसैनिकांनी व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यापुढे आंदोलन केले. घटनेचा निषेध व्यक्त करत मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. या दरम्यान, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाह्या 25 शिवसैनिकांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.
मी कधीही झुकणार नाही शिवसेना सोडणार नाही ः संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना फोर्ट येथील ईडी कार्यालयात नेण्यात आले. तिथे प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत बोलले की, ईडी मला अटक करणार आणि मी अटक करवून घेणार आहे. महाराष्ट्र आणि शिवसेना कमजोर करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. खोटी कागदपत्रे आणि खोटय़ा जबानांच्या आधारे केस उभी केली जाते. राजकीय सूडापोटी हा खेळ सुरू आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, मी महाराष्ट्राशी कधीच बेईमानी करणार नाही. मरेन, पण झुकणार नाही. आम्ही लढत राहू. संजय राऊत कधीही शिवसेना सोडणार नाही, कधीही झुकणार नाही, असे त्यांनी सांगितले.सकाळी ईडीचे पथक निवासस्थानी दाखल झालेले असताना संजय राऊत यांनी ट्वीट करून आपला कुठल्याही घोटळ्याशी संबंध नसल्याचे म्हटले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असे त्यांनी म्हटले होते.
ही सुडाची कारवाई नाहीच ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पेंद्रीय तपास यंत्रणांनी यापूर्वी देखील अशा कारवाया केल्या असून त्या तपासून घ्याव्यात. अशा कारवाया होतात म्हणून भाजपात येण्याचे पुण्याचे काम करु नये. ही सुडाची कारवाई नाही. सुडाच्या कारवाईची गरजच काय ? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आतापर्यंत एक तरी सुडाची कारवाई केली का? जे शिवसेनेतून आमच्याकडे आले, त्यातील एकाही आमदाराने ईडीच्या कारवाईबाबत अथवा सुडाबद्दल काहीच म्हटले नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. राऊत यांची ‘ईडी चौकशी सुरु आहे. मी काही केले नाही. ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला.’ या विधानाची आठवण देत चौकशी होऊ द्या त्यातून पुढे काय येईल ते कळेलच. मविआचे ते मोठे नेते होते. दरदिवशी ते पत्रकार परिषद घेत होते असल्याचीही यावेळी शिंदे यांनी आठवण करुन दिली.
राऊत यांना नवाब मलिकांच्या शेजारी जावे लागणार ः किरीट सोमैया
राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात. त्यासाठी पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? राऊतांनी दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी घेतल्या याचा खुलासा झाली की राऊत आर्थर रोड जेलमध्ये जातील. राऊत यांना नवाब मलिकांच्या शेजारी जावे लागणार अशी टिका भाजपाच्या किरीट सोमैय्या यांनी केली. माफिया पोलिस आयुक्त संजय पांडेनंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. गोरेगाव पत्राचाळ 1200 कोटींचा घोटाळा, वसई, नायगाव 2000 कोटींचा युरीटेक बल्ब घोटाळा, अलिबागमध्ये जमिनी, मुंबई, दादरमध्ये फ्लॅट सदनिका, विदेश दौरा, चीन दौरा, दुबईमध्ये कुणाकुणाच्या भेटी, या सर्व घटनांचा हिशोब राऊत यांना द्यावा लागणार त्यामुळेच त्यांची आर्थर रोड जेलमधील नवाब मलिकांच्या शेजारची जागा बहुमान म्हणून संजय राऊत यांना मिळणार आहे.
दमनशाही, दडपशाही सुरू ः उध्दव ठाकरे हे सगळ कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज, लज्जा, शरम सोडून हे कारस्थान चाललेले आहे. दमनशाही, दडपशाही सुरु असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, हिंदुत्व हा शब्द बोलायचं तेव्हा कुणाचं धाडस होत नव्हत, तेव्हा शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते आज जे बसलेत त्यांची नामोनिशाणी तरी होती का? काय केल त्यांनी? पण तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, तुमच्या सारखे जिवाला जीव देणारे शिवसैनिक आणि त्यांच्या जोरावर त्यांनी सांगितले अमरनाथ यात्रेमध्ये जर का वेडे वाकड घडल तर मी इकडून तुमची हजला जाणारी विमान उडू देणार नाही. तेव्हा जी परिस्थिती होती तेव्हा हे कुठे रांगत होते माहिती नाही. आता यांना मात्र हिंदुत्वाचा एक पुळका आलेला आहे.