Sanjay Raut meet Satyapal Malik शिवसेना (ठाकरे गटाचे ) खासदार संजय राउत ( Sanjay Raut ) यांनी आज जम्मु आणि काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Governor Satyapal Malik) यांची भेट घेतली. सत्यपाल मलिक यांनी काही दिवसापुर्वी पुलवामा येथिल हल्लाबाबत एक महत्वपुर्ण विधान करून खळबळ उडवली होती.
सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्र सरकारवर आरोप करून शासनाच्या नाकर्तेपणामुळे 40 जवान शहिद झाले असल्याचा आरोप केला. पुलवामा येथे झालेल्या हल्लामुळे होणारी हानी ही रोखली जाऊ शकली असती असा दावाही त्यांनी केला होता. सत्यपाल मलिक यांच्या या आरोपानंतर काही दिवसांनी सीबीआयने त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात समन्स बजावले आहेत.
माजी गव्हर्नरांना जम्मु आणि काश्मिर राज्यातील विमा घोटाळ्यावरून समन्स बजावल्यानंतर शिवसनेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा होऊन त्यावर एकमतही झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच हा लढा आपण एकत्रितपणे दिला पाहीड आणि या लढ्यात आपण लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास दोघांनी व्यक्त केला.