ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्या कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील असे म्हंटले होते. तसेच काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असंही ते काल झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी भाजपला आव्हान दिलं होत. तसेच आज पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे करणार होते. त्यामुळे हे भाजपाचे साडेतीन लोक कोण? संजय राऊत नक्की कोणते खुलासे करणार ? याकडे सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं आहे.
पत्रा चाळीची जमीन खरेदी पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैशातून केली. मोहित कंबोज याने ही जमीन खरेदी केली.
ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी मी या आधीच सांगितलं आहे …मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू…तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल. चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसं याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन…जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण?
मुंबईतल्या ६० लोकांनी ३०० कोटी जमा केले. कुठं झालं मनी लाँड्रिंग आणि ईडीचे लोक कुठं बसतात काय करतात? हे मी देशाला सांगेन. मला गोळी मारा, जेलमध्ये टाका काहीही करा मी घाबरणार नाही.
पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट आणि नील सोमय्या यांना ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे, सगळे पेपर्स मी ईडीकडे तीन वेळा पाठवले. गेल्या तीन महिन्यात किमान तीन वेळा ईडी कार्यालयात पाठवले. तुम्ही एक दोन गुंठेवाल्यांना बोलावता. किरिट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही आणि खिचडी खात असल्याचं मी बघितलंय.
राकेश वाधवान पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. बराच मोठा बिल्-डलर आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यावर २० कोटी गेलेत, हे सर्वांना माहितीय. ईडी वाले सुनो, माझं बोलणं आज ऐकावं लागेल. ईडी आणि सीबीआय पंतप्रधान आणि गृहमंत्री आज माझं बोलणं ऐकतायत हे मला माहितीय.
सोमय्या म्हणतात की राकेश वाधवान भयंकर माणूस आहे, घोटाळा केला म्हणतात. पण निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे, ही कंपनी सोमय्यांची आणि त्यांच्या मुलांची आहे, तो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. पीएमसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन लाडानी याच्या नावावर घेतली. रोख रक्कमसुद्धा घेतली ही रक्कम ८० ते १०० कोटींच्या घरात आहे. जमिन लडानीच्या नावावर घेतलीय. वसईत ४०० कोटी रुपयांची जमिन साडेचार कोटी रुपयांना घेतली
ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन असं राऊत यावेळी म्हणले. तसेच मराठी भाषेच्या विरुद्ध कोर्टात जाणारा दलाल भाजपचे नेतृत्व करत असल्याचेहि ते म्हणाले.
मी ज्या ज्या वेळी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांवर, कुटुंबियांवर छाडी पडल्या. माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना उद्या पोलीस घेऊन जातील. इतकं घाणेरडं राजकारण भाजपाकडून सुरू आहे. तसेच मी जिथे कपडे शिवले त्याचीही राष्ट्रीय यंत्रणांकडून चौकशी केली. मुलीच्या लग्नाचे ज्याला कंत्राट दिले त्याच्यवरही चौकशीसाठी दबाव.
पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले, “सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही.”