मुंबई: संभाजीराजेंचा विषय आमच्याकडून संपला आहे. जे कोण माझ्यावर संताप व्यक्त करतात त्यांनी, पंधरा दिवसांच्या घडामोडी बघाव्यात.शिवबंधन बांधावे ही आमची भूमिका आहे, अट नाही,असे संजय राऊत म्हणाले. आम्ही ४२ मतांचा कोटा देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. संभाजीराजेंना राजकारणाचं वावडं नाही.संभाजीराजेनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे इतकी अपेक्षाआहे. यापुर्वी त्यांचे बंधू काँग्रेसमधून लढले आहेत, स्वतः संभाजीराजे राष्ट्रवादी कडून लोकसभा लढले आहेत, त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेकडून लढावे अशी अपेक्षा शिवसेना नेते संजय़ राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
राज्यसभेच्या दुसऱ्या जागेकरिता शिवसेनेचाच उमेदवार असावा ही अट घालत छत्रपती संभाजीराजे यांची कोंडी करण्याचा प्रय़त्न शिवसेनेने केला. शिवबंधन हातात बांधा अशी अपेक्षा असल्याचे संजय राऊत हे सुरुवातूपासून सांगत आहेत. मात्र संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढणार या मतावर ठाम आहेत.राज्यसभेसाठी आमच्य़ाकडे दोन जागा आहेत. त्यामुळे त्या जागेवर दोन शिवसैनिक निवडून येतील. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.
आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि निवडून येऊ. जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देत आहे हे स्पष्ट होतंय. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही असे संजय राऊत याआधी म्हणाले होते.
दरम्यान काल(ता.24) शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधत संभाजीराजेंचा विषय आमच्याकडून संपला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.