ऑनलाईन टीम / मुंबई
असले शिवसैनिक कोण ? असा उलटप्रश्न करताना जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत ते शिवसैनिक असून त्यांच्याच मार्गदर्शना खाली शिवसेना आपले ध्येय गाठेल. असे शिवसेना नेते संजय राउत यांनी म्हटलयं. ते आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
“बाळासाहेबांचे अशिर्वाद लाभले असते तर आज तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. पण तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदावर बसावे लागले. भाजपने अगोदरही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर केला होता. आजही त्यांच्याच शिवसैनिकांना कैद करून सत्ता स्थापन केली आहे.” “बळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे. त्या आगीशी खेळाल तर तुमचे हात पोळले जाईल. महाराष्ट्रात तुकारामांचे अभंग चालतात, मंबाजीचे नाही.” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले “आज तुम्ही 40 आमदारांच्या गटाला मुख्यमंत्रीपद दिले आहे. पण 2019 ला शिवसेनेच्या 56 जागा असताना मुख्यमंत्रीपद का नाकारलं गेलं? भाजप आता दिनदयाल उपाध्य़ाय आणि शामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचाराचा राहिलाय का ?” असा प्रश्नही त्यांनी भाजपला विचारला.