ऑनलाईन टीम/ तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एक एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ३२ माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. तसेच नवी मुंबई महापालिकेचे काही माजी नगरसेवकही शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहेत. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पुन्हा बंडखोर आमदारांवर पून्हा हल्लाबोल केला आहे. १०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे, असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात जाऊन सामिल झाले आहेत. त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तसेच, अनेक नगरसेवकही शिंदे गटात गेलेत. अनेक खासदारही शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बंडखोर आमदारावंर टीका केली आहे. १०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे, असं म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना टीकास्त्र सोडलं. संजय राऊत नाशिकमध्ये बोलत होते. आज नाशिकमध्ये मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान तुफान पाऊस पडला. मात्र, पावसातही राऊतांचं भाषण सुरू होतं. तसेच, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी गर्जना करून परिसर दणाणून सोडला.
हे ही वाचा : महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री, राऊतांचा शिंदेंना टोला
४० आमदार म्हणजे शिवसेना नाही, २-५ खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असं होत नाही. १०० आमदार, २५ खासदार निवडणून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी ‘आमचा धनुष्यबाण’ हे शब्द अधोरेखित केले. तसेच, शिवसेना आमच्याच बापाची आहे. पन्नास खोके देऊन आमची शिवसेना विकली जाणार नाही, असंही ठणकावून सांगितले.