ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री (matoshree) निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावर खा. नवनीत राणा (navneet rana) आणि आ. रवी राणा (ravi rana) ठाम आहेत. त्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेर शिवसैनिकांची गर्दी असून, राणा दाम्पत्याला खाली येण्यासाठी घोषणाबाजी सुरू आहे. सकाळी काही शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून राणा यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुंबईतील ही परिस्थिती तणावाची असतानाच संजय राऊत (sanjay raut) यांनी एक ट्विट करत राणा दाम्पत्य आणि भाजपला इशारा दिला आहे.
राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐसी तैशी… जय महाराष्ट्र!”
या ट्विटपूर्वी माध्यमांसमोर बोलताना राऊत यांनी म्हटले होते की, मुंबईत येऊन तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक शांत बसणार नाहीत. कायदा-सुव्यवस्था काय आहे आणि सरकारने काय केलं पाहिजे हे सल्ले तुमच्याकडून ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याची परिस्थिती आमच्यावर आली नाही. कोण आहात तुम्ही? कोणच्या तरी पाठबळावर मुंबईत आलात. आता तुम्ही जर लक्ष्मण रेषा ओलांडाल तर शिवसैनिकांनाही तुमच्या घरापर्यंत पोहचण्याचा अधिकार आहे.