1 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविले जाणार अभियान; गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचा उद्देश
कोल्हापूर प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या घोषवाक्यानुसार पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू आहे. देशातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारणे आणि गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे या उददेशाने तसेच ’जल जीवन सर्वेक्षण 2023′ चा भाग म्हणून जलशक्ती मंत्रालय, केंद्र शासनाव्दारे 01 ते 31 डिसेंबर, 2022 या कालावधीत ’स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान अंतर्गत अस्तित्वातील सर्व नळ पाणी पुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱया योजनांच्या प्रमुख स्त्राsतांचे तसेच नवीन योजनांच्या स्त्राsतांचे काम पुर्ण झाले असल्यास अथवा स्त्रोत अस्तित्वात असल्यास त्याचे देखील ’हर घर जल’ या ऍपद्वारे जीओ टॅगिंग पूर्ण करणे, प्रत्येक नळ पाणी पुरवठा योजनेच्या स्त्राsतांची मान्सून पश्चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पुर्ण करणे, क्षेत्रीय पाणी परिक्षण संचाव्दारे पाणी तपासणी करण्यासाठी गावस्तरावर नियुक्त केलेल्या महिलांना प्रशिक्षण देवून पाणी गुणवत्ता तपासणी पुर्ण करणे, अभियानादरम्यान रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवून वरिष्ठ भू-वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कोल्हापूर यांच्याद्वारे अभियान कालावधीत प्राप्त होणाऱया सर्व पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करून त्याची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच, या अभियान अंतर्गत गावस्तरावर पाणी गुणवत्ता विषयक कामांसाठी निवड केलेल्या 5 महिलांची नावे व पाणी गुणवत्ता विषयक माहिती गावातील दर्शनी भागात लावण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय पाणी परिक्षण संच ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेले आहेत. तसेच या परिक्षण संचाव्दारे पाण्याची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर 5 महिलांची निवड करण्यात आली असून, रासायनिक व जैविक क्षेत्रीय परिक्षण संचाद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणे व तपासणी अहवालाच्या नोंदी ठेवणे याबाबत प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. पाण्याची रासायनिक तपासणी करण्यासाठी सर्व ग्राम पंचायतींना रासायनिक परिक्षण संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याव्दारे क्लोराईड, फ्लोराईड, पाण्यातील एकूण विद्राव्य घटक, नायट्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गढूळता, एकूण अल्कालॅनिटी,एकूण कठीणता आदी पाण्यातील घटकांची स्त्राsतांच्या जागेवर तपासणी करण्यात येणार आहेत. याद्वारे बाधीत आलेल्या स्त्राsतांवर तात्काळ उपाय योजना करून दुषित पाण्याद्वारे जलजन्य साथरोगावर नियंत्रण ठेवण्यात येवून ग्रामीण भागातील जनतेस शुध्द व स्वच्छ पिण्यास पाणी उपलब्ध करण्यात येईल व त्याद्वारे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान हेतू यशस्वीपणे राबविता येईल, असे सीईओ चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्राम पंचायत विभाग आणि भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या विभागांनी समन्वयाने काम करून हे अभियान यशस्वी करणेसाठी शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करावी. तसेच अभियान कालावधीमध्ये गावस्तरावरील पाणी नमुने तपासणीसाठी वेळेत प्रयोगशाळेत पोहचविणे व उपलब्ध क्षेत्रीय पाणी परिक्षण संचाव्दारे स्त्राsतांची तपासणी करणे याची खबरदारी ग्रामसेवक आणि जलसुरक्षक यांनी घ्यावी. या उपक्रमाचे सनियंत्रण तालुकास्तरावरून गटविकास अधिकारी यांनी करावे अशा सूचना सीईओ चव्हाण यांनी दिल्या आहेत.